Sharad Pawar On Satya Pal Malik: सत्यपाल मलिकांच्या पुलवामा घटनेवरील वक्तव्यावर शरद पवार स्पष्टच बोलले…

0

मुंबई,दि.17: Sharad Pawar On Satya Pal Malik: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर खळबळजनक दावा केला होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरनं थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल 40 CRPF जवान शहीद झाले होते. पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे तेव्हा पुलवामा हल्यासंदर्भात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांत राहाण्यास सांगितलं होतं, असा दावा मलिक यांनी केला होता.

मलिक यांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले… | Sharad Pawar On Satya Pal Malik

मलिक यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यासंदर्भात भाष्य केले. सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांनी मागणी केली. राजनाथजींकडे मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिले असते. कसेही करून दिले असते. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिले असते, तर हे घडले नसते. तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही आत्ता शांत राहा, असा गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. यावर आता एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी भाष्य केले आहे. 

Sharad Pawar On Satya Pal Malik
शरद पवार

सत्यपाल मलिकांनी सांगितलेली परिस्थिती सत्य होती | Sharad Pawar

काश्मीरमधील पुलवामा येथे आपल्या 40 जवानांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपाच्या विचाराचे होते. भाजपानेच त्यांनी नियुक्त केली होती. आता राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगितील. आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट आणि आवश्यक ती साधनं वेळेवर न दिल्याने ही घटना घडली. तसेच पंतप्रधांनी त्यांना या विषयावर शांत राहायला सांगितल्याचेही, ते म्हणाले. ही सत्य परिस्थिती होती. आपल्या सैनिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी केंद्रातील भाजप सरकारवर आहे. मात्र, सरकार ही जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.

दरम्यान, काँग्रेसने सत्यपाल मलिक यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवरून जोरदार टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पुलवामा हल्ला आणि त्यात 40 जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले. जर आपल्या जवानांना एअरक्राफ्ट मिळाले असते, तर दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त झाला असता. तुम्ही तर या चुकीसाठी कारवाई करणे अपेक्षित होते. पण तुम्ही हे प्रकरण फक्त दाबलेच नाही, तर स्वत:ची प्रतिमा जपण्याचा तुम्ही प्रयत्न केला. पुलवामावर सत्यपाल मलिक यांचा खुलासा ऐकून देश स्तब्ध झाला आहे, असे काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here