प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 

0

मुंबई,दि.28: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. बीड आणि परभणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट महत्त्वाची आहे. फडणवीस यांची भेट का घेतली, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, परभणीच्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत ही किरकोळ असून, त्यांना एक कोटींची भरपाई देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी.

परभणी प्रकरणात चौकशी करून ज्यांनी निरपराध नागरिकांना क्रूरपणे मारहाण केली आहे. अशा पोलिसांच्या विरोधात एफआयआर नोंदवली गेली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली ती मागणी त्यांनी मान्य केली आहे. असे आंबेडकर म्हणाले. 

आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन काही नागरिकांच्या घरांची मोडतोड करण्यात आलेली आहे. अशा नागरिकांना शासनाने नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे. 

त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थांच्या DBT संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here