परभणी,दि.25: परभणीत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. मनोज जरांगे परभणी दौऱ्यावर आहेत.
आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या असे म्हणतो. आता कळेल आरक्षण देतो की नाही ते, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, मी राहू न राहू पण आरक्षणासाठी लढा देणार आहे. मराठा आरक्षणाचा विषय मिटला की शेतमालाला भाव हे कसे देत नाही तेही बघतो, असे त्यांनी म्हटले आहे. तर 25 जानेवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.