मुंबई,दि.23: सोलापूरचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून काल 43.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान होते. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने मराठवाडा आणि कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. उकाड्यातही वाढ झाली आहे. विदर्भात पारा तर 45 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं दहा उष्ण शहरात विदर्भातील पाच शहरे आहेत.
या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसंच, कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.