अमरावती,दि.३०: Kadu Rana Controversy: आमदार बच्चू कडू यांनी गौप्यस्फोट करत काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार अशी प्रतिक्रिया राणा कडू वादावर दिली आहे. आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आमदार रवि राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद हा शिगेला पोहचला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रविवारी या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
मात्र प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या असून, काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार, असा गौप्यस्फोट आमदार बच्चू कडू यांनी रविवारी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मी रात्री आठ वाजता मुंबईला निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांशी बाेलताना आमदार रवि राणा यांनी केलेल्या बदनामीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.
मात्र आमदार रवि राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलला आहे, मला असे वाटते आता त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला तर ठीक त्याने जे काही आरोप केले त्या संदर्भात त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा समाधान झाले तर १ नोव्हेंबर रोजी ‘अल्टिमेटम’बाबतचा विचार करू आणि जे बदनामी केली आहे ते परत द्यावी, विषय संपला असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यात खोके, किराणा वाटपावरून सुरू झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. राणा, कडू या दोन्ही आमदारांना भेटीसाठी वेगवेगळी वेळ दिली आहे. त्यानुसार आमदार रवि राणा हे रविवारी सकाळी ९.२५ वाजताच्या सुमारास मुंबईला गेले आहेत. तर आमदार बच्चू कडू हे रविवारी रात्री ८ वाजता मुंबईला जातील, असे त्यांनी स्वत: सांगितले आहे.