Sharad Pawar: उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाबाबत शरद पवार म्हणाले…

0

मुंबई,दि.११: Sharad Pawar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाबाबत शरद पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे. आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडी घडल्या. विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करत सुरतमार्गे गुवाहाटी गाठली. यानंतर बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त केले आहे. सहकारी पक्षांना विचारत न घेता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्रीपद हे तीन पक्षांनी एकत्र येऊन तयार झाले होते | Sharad Pawar On Uddhav Thackeray

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्रीपद हे तीन पक्षांनी एकत्र येऊन तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. राजीनामा देण्याचा देण्याचा निर्णय कोण घेत असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण, अन्य सहकारी पक्षांबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेतल्याने दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने तेव्हा ही चर्चा झाली नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.”

…तर त्याला विरोध करणार नाही

अदानी समूहाच्या ‘जेपीसी’ चौकशीवर देखील शरद पवारांनी भूमिका मांडली आहे. “विरोधी पक्षातील सहकाऱ्याचं वेगळे मत आहे. आम्हाला विरोधी पक्षात ऐक्य ठेवायचे आहे. त्यामुळे सहकारी मित्र पक्षांना ‘जेपीसी’ चौकशी व्हावी वाटत असेल, तर त्याला विरोध करणार नाही.”

“त्यांच्या मताशी सहमत नाही. पण, विरोधकांच्या ऐकीवर दुष्पपरिणाम होऊ नये, म्हणून आम्ही आग्रह धरणार नाही,” असं शरद पवारांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here