नाशिक,दि.१२: हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज देशभरात हनुमान जयंती साजरी केली जात आहे. अनेक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.
नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यानंतर मंदिराबाहेरच्या परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.
मधमाशांच्या या हल्ल्यात 70 ते 80 भाविक जखमी झाले असून जखमींचा आकडा मोठा असल्याचं प्रथमदर्शनींकडून सांगण्यात येत आहे. भाविक मंदिरात दर्शनासाठी जात असचाना अचानकत मधमाशांनी हल्ला केल्यामुळं तिथं काही कळायच्या आतच प्रचंड पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं.