सोलापूर,दि.11: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सोलापूरसह संपूर्ण राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार जोरात सुरू केला आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होणार आहे. निवडणुकीच्या काळात अनेकदा भांडणे, मारामाऱ्या होतात. सर्वच राजकीय उमेदवारांसाछी कार्यकर्त्ये जोमाने प्रचार करतात.
दारातही उभे केले जात नाही
अनेक पत्रकारही प्रचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. कार्यकर्त्ये तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी मनापासून सत्यपरिस्थिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र ज्यांच्यासाठी हे करतात ते निवडणूक झाल्यानंतर यांना किंमतही देत नाहीत. निवडणूक काळात ज्यांना घरात घेतले जाते, त्यांना निवडणूक झाल्यानंतर दारातही उभे केले जात नाही. त्यामुळे निवडणूक काळात प्रत्येकांनी आपले हितसंबंध जपण्यासाठी विनाकारण यात वाहत जाऊ नये.
कारण अनेक ठिकाणी निष्ठांवतांना किंमत नसते. कामगिरीपेक्षा चमचेगिरीला महत्व आहे. अलिकडच्या काळात दिखाव्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही राजकीय नेत्यासमोर किती दिखावा करता याला महत्त्व आहे. प्रत्यक्षात तुम्ही मनापासून किती प्रचार करता याला महत्त्व नाही. या परिस्थितीला अनेक राजकीय नेते अपवाद आहेत. ते नेते दिखाव्यापेक्षा कृतीला महत्व देतात. त्यामुळे राजकीय वैरत्व न घेता जपून प्रचार करणे गरजेचे आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात व सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.