प्रकाश आंबेडकर यांनी दिले नव्या आघाडीचे संकेत

0

मुंबई,दि.29: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत. संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करत आहेत. असा आरोप आंबेडकर यांनी केला. भाजपच्या विरोधात मजबुत आघाडी उभी करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. संजय राऊत महाविकास आघाडीबाबत चुकीची माहिती देत आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

आम्हाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं लक्षात आलं, असं सांगतानाच 2 एप्रिल रोजी आम्ही सर्व काही क्लिअर करणार आहोत, असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत. तसेच माझे दरवाजे आजही बंद झालेले नाहीत. सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी उभी राहावी असा आमचा प्रयत्न आहे. पण आम्हाला ज्या पद्धतीची आघाडी पाहिजे होती ती उभी राहत नाही अशी परिस्थिती आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील विविध संघटनाशी बोलून 2 एप्रिल पर्यंत नवीन आघाडी उभी राहील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. लोकसभेच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आमचे मध्यंतरी चर्चा झाली. 

आमचे दरवाजे उघडेच आहे. महाविकास आघाडीसोबतच चर्चा केली पाहिजे असं नाही. आम्ही वैयक्तिक चर्चाही करू शकतो, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी आघाडीत बिघाडी केली असा गंभीर आरोप देखीस प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

मुंबईत प्रकाश आंबेडकरांची पुण्यातील वसंत मोरेंनी भेट घेतली. वसंत मोरे हे पुण्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आंबेडकरांसोबत अर्ध्या तास चर्चा केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, उमेदवारीबाबत आंबेडकर निर्णय घेतील असं मोरेंनी म्हटले. तर, राज्यातील नवी समीकरणं जुळवण्यासाठी पुढील 3 ते 4 दिवसांत निर्णय घेऊ. राज्यात नव्या राजकारणाची सुरूवात होणार असं सूचक विधान यावेळी आंबेडकरांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here