तरुणाला साप चावला, मग तरुण सापाला चावला, साप मरण पावला

0

मुंबई,दि.5: सर्पदंशामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण, बिहारच्या नवादामध्ये सर्पदंशामुळे तरुणाचा मृत्यू झाला नसून, सर्पदंशामुळे सापाचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील नवादा येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे साप चावल्याचा राग आलेल्या एका तरुणही सापाला चावला. त्यामुळे सापाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने राजौली उपविभागीय रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी ती व्यक्ती म्हणते की माझ्या गावात एक युक्ती आहे की साप तुम्हाला एकदा चावला तर तुम्ही त्याला दोनदा चावा.

वास्तविक, राजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलव्याप्त भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरा सर्व कामगार त्यांच्या बेस कॅम्पमध्ये झोपले होते. यावेळी संतोष लोहार नावाच्या मजुराला दोन वेळा विषारी साप चावला. यानंतर संतप्त झालेल्या कामगाराने लोखंडी रॉडच्या साहाय्याने सापाला पकडले आणि सापाला तीन वेळा चावा घेतल्याने साप मरण पावला.

…तर तुम्ही दोनदा चावा

ही बाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी या तरुणाला तातडीने उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संतोष लोहार असे या तरुणाचे नाव असून तो झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यातील पांडुका येथील रहिवासी आहे. सर्पदंश झाल्यानंतर संतोष लोहार यांनी सांगितले की, माझ्या गावात एक युक्ती आहे की जर तुम्हाला एकदा साप चावला तर तुम्ही दोनदा चावा. हे तुम्हाला सापाचे विषापासून वाचवेल.

या प्रकरणावर उपचार करणारे डॉक्टर सतीश चंद्र यांनी सांगितले की, संतोष लोहार नावाच्या व्यक्तीला साप चावला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्याचवेळी गावकऱ्यांनी साप विषारी नसतो, साप विषारी असता तर तरुणाला जीव गमवावा लागला असता, असे सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here