बस आणि कारचा भीषण अपघात, 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

0

दि.15 : बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसने पेट घेतल्याने 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. झारखंडमधील रामगड येथे हा अपघात (Accident in Ramgarh Jharkhand) झाला आहे. भरधाव बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावर तात्काळ बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. News 18 लोकमतने या संदर्भात वृत्त दिले आहे.

बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारमधील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामगड जवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वच पाचही जण हे बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. भररस्त्यात बस आणि कारने पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र, अपघात झालेली कार ही बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here