सोलापूर,दि.२८: Solapur News: तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतताना अपघातात मरण पावलेल्या चौघा मित्रांचे मृतदेह शुक्रवारी सोलापुरात आणल्यानंतर त्यांची एकत्रित अंत्ययात्रा काढण्यात आली. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत तर मयूर मठपती यांच्यावर अचलेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (Solapur Accident News)
अथर्व टेंभुर्णीकर, मयूर मठपती, हृषीकेश जंगम, अजय लुत्ते, अंबादास कुमार अशी अपघातात मरण पावलेल्या पाचजणांची नावे आहेत. तर राहुल इराणी, रोहन इराणी, यश पाटील, श्री नेर्लेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. हे जुळे सोलापुरातील कुमठेकर हॉस्पिटलजवळील सर्व सर्व मित्र तिरूपती बालाजीच्या दर्शनाला कारमधून दर्शनाला सोमवारी गेले होते.
भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू | Solapur Accident News
तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन बुधवारी परतत असताना तिरुपती जिल्ह्यातील चंद्रगिरी तालुक्यात भरधाव तवेरा कार (एमएच १२, पीएच ९७०१ ) रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिली. यात कारचा समोरील भाग चक्काचूर झाला होता. त्यात पाचजण ठार झाले. जखमींना तिरुपती येथील तिरुपती रुईया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.
कुटुंबीयांनी केला आक्रोश | Solapur News
मृत झालेल्या पाचजणांचे शवविच्छेदन तेथे केल्यानंतर त्यांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास जुळे सोलापुरात आणण्यात आले. त्यावेळी त्यांचा कुटुंबीयांनी आक्रोश केला. सकाळी अकराच्या सुमारास चौघा मित्रांची एकत्रित अंत्ययात्रा काढून मोदी स्मशानभूमीत प्रत्येकाच्या धडक धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तर मयूर मठपती यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी अचलेर येथे नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.