मुंबई,दि.10: भाजपा नेते मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सांगलीतील हिंदू गर्जना सभेत बोलताना नितेश राणे वादग्रस्त विधान केले आहे. नितीश राणे यांनी सभेत मुस्लिम समाजाला लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ईव्हीएममुळे आमचा विजय झाला आणि आम्ही ते नाकारत नाही, पण ईव्हीएमचा अर्थ समजून घेण्यात विरोधकांना अपयश आल्याचे ते म्हणाले.
नितेश राणे हे महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत. राणे म्हणाले की, आम्ही ईव्हीएममुळे निवडणुका जिंकलो आणि आम्ही हे कधीच नाकारले नाही, मात्र ईव्हीएमचा अर्थ समजून घेण्यात विरोधकांना अपयश आले. याचा अर्थ मुल्ला विरुद्ध प्रत्येक मत. आमचे विरोधक ईव्हीएमबाबत कशी ओरड करतात ते तुम्हाला माहीत आहे. हिंदू एकत्र येऊन हिंदूंना कसे मतदान करत आहेत हे त्यांना पचनी पडत नाही.
ते नेहमी ईव्हीएमला दोष देतात. त्यांना ईव्हीएमचा अर्थ कळत नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हिंदूंनी कोणत्या संदर्भात मतदान केले हे त्यांना समजत नाही. ईव्हीएम म्हणजे मुल्लाच्या विरोधातले प्रत्येक मत. त्यामुळेच आम्ही ईव्हीएममुळे निवडून आल्याचे अभिमानाने सांगत आहोत आणि आम्ही तीन आमदार येथे बसलो आहोत.