सोलापूर,दि.८: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना पवारांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांचे कुटुंबीय आता प्राप्तिकर, विभागाच्या रडारवर आले आहेत. अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावरही पवारांनी भाजपवर टीका केली आहे.
‘मलाही ईडीने नोटीस पाठवली होती. पण त्याचं काही झालं नाही. कारण नसतानाही ईडीची नोटीस पाठवली आहे. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला आजिबात नाही. हे सुडबुद्धीने राजकारण सुरू असल्याची’ टीका शरद पवारांनी केली आहे.
यावेळी बोलताना, शरद पवार यांनी स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. जिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान होईल तिथेच आम्ही एकत्र अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सन्मान मिळाला नाही तर आम्ही स्वतंत्र लढवू असं वक्तव्य पवारांनी केलं आहे. इतकंच नाहीतर आगामी निवडणुकांसाठी महिलांनी आणि तरुणांनी तयार होण्याची गरज आहे. तरुण कार्यकर्त्यांना संधी देणं महत्त्वाचं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.