सोलापूर,दि.17: भाजपा नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की हिंदू मतदार आता टीएमसीला अजिबात मतदान करणार नाहीत आणि लोक चिंतेत आहेत.
मिथुन यांनी ममता बॅनर्जी सरकारवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला आणि म्हटले की जर भाजपा सत्तेत आला तर परिस्थिती सुधारेल. ममता बंगाली हिंदूंसाठी धोका आहे. वक्फ कायद्यावरून मुस्लिमांची दिशाभूल केली जात आहे.
मिथुन यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल | Mithun Chakraborty On Mamata Banerjee
मुर्शिदाबाद आणि बंगालमधील अनेक ठिकाणी वक्फ कायद्याविरुद्ध झालेल्या हिंसाचारावरून मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. मिथुन म्हणाले, ‘हिंसाचारानंतर बंगाली हिंदू बेघर झाले. आता त्यांच्या डोक्यावर छप्पर नाही. त्यांना खिचडी खाण्यास भाग पाडले जाते. हिंसाचारात हिंदूंची दुकाने जाळण्यात आली आणि त्यांचे नुकसान करण्यात आले.
मिथुन यांनी पश्चिम बंगाल सरकारवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘संपूर्ण भारत म्हणत आहे की ममता तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. जर भाजप सत्तेत आली तर या सर्व गोष्टींचा अंत होईल. जर भाजपने सरकार स्थापन केले तर ते दंगली घडवतील असे खोटे आरोप तृणमूल काँग्रेस करत आहे.