“आमचंच खायचं, आमच्यावरच बोलायचं आणि आम्हालाच…” मनोज जरांगे पाटील

0

छत्रपती संभाजीनगर,दि.26: ‘वय झाल्यामुळे भुजबळ असं बोलतात, त्यांचे केस पांढरे होऊन उपयोग काय, जर दुसऱ्या समाजाबद्दल आकस असेल.’ असं म्हणत जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) हिंगोलीतील भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) भाषणावर प्रत्युत्तर दिलं आहे. हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेतून (OBC Sabha) छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांची चांगलाच समाचार घेतला. मला म्हातारा म्हणतोय,पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत, असं भुजबळांनी म्हटलं बोलताना म्हटलं होतं.

हिंगोलीमध्ये झालेल्या सभेतून छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केलं, तसंच दोन महिन्यांमध्ये दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ यांची ही मागणी आणि टीकेवर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे.

अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या या आरोपांवरही जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. आमच्या अंतरवालीच्या लोकांवर निष्पाप लोकांवर अन्याय झालाय, गृहमंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. अटक का केली याचं कारण सांगा? माझे कुणाही बरोबर फोटो आहेत, महाराष्ट्रात कुणीही कुणाबरोबर फोटो काढू शकतात, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आमचंच खायचं, आमच्यावरच बोलायचं आणि…

‘भुजबळांना म्हणा दुसरे कायदे सांगू नका, मराठा ओबीसीमध्ये आहे हा कायदा सांगा. पांढरे केस झाले हे नका सांगू, पांढरे केस झाले तर आंदोलन सभा कशाला घेता? जातीयवादमध्ये आणू नका. आम्हाला इडब्ल्यूएस नको, आमचंच खायचं, आमच्यावरच बोलायचं आणि आम्हालाच कायदा शिकवायचा. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी आम्हाला शिकवू नये, त्यांना किती आधार आहे आम्हाला माहिती आहे,’ असं निशाणा जरांगे पाटील यांनी भुजबळांवर साधला.

‘ते जुने जाणते बुजुर्ग नेते आहेत, बीडमध्ये दौरा करून काडी लावून आले. तुम्ही घटनेच्या पदावर होता मग अंतरवाली सराटीमध्ये महिलांवर लाठीचार्ज झाला, तो पाहायला का आले नाही? महाराष्ट्राची जनता यांच्यासाठी आई-बहिण आहे तर ते अंतरवालीत अश्रू पुसायला का आले नाहीत?’ असा सवालही जरांगे पाटील यांनी विचारला.

आमचे रद्द झालं तर तुमचंही…

‘शासनाच्या नोंदी सांगतात, ज्यांच्या नोंदी आहे त्यांना आरक्षण द्या. झुंडशाही त्यांची आहे आमची नाही, त्यांचं हॉटेल त्यांनी जाळलं आहे. ते सर्व त्यांनीच मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी घडवून आणलं. दुसऱ्यांवर ढकलून द्यायचं हा त्यांचा धंदा आहे,’ असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे. ‘आमचे रद्द झालं तर तुमचंही सर्व ऑटेमेटिक रद्द होईल, हा आमचा इशारा नाही. आमच्या शासकीय नोंदी आहेत, तुमच्याकडे नोंदीपण नाही, मग तुम्हाला कसं ओबीसीमध्ये घेतलं? आम्ही चॅलेंज केले तर तुम्हाला तर न्यायालय एक मिनिटात काढेल. 24 डिसेंबरपर्यंत थांबा, तुम्ही पांढरे कसे झाले, काळे कसे झाले हे सर्व मी सांगतो,’ असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here