निवडणूक आयोगाने घोटाळा केला: जितेंद्र आव्हाड 

0

मुंबई,दि.29: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. यात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार फक्त 10 जागांवर तर शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार 20 जागांवर विजयी झाले. काँग्रेसला 10 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे 132 उमेदवार निवडून आले आहेत. निवडणूक निकालावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. 

ईव्हीएम मशीनवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सातारा जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघात दोन पराभूत उमेतदवारांना सारखी मतं मिळाली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने घोटाळा केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. तसेच लक्षात येईल असे घोटाळे करू नये असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.

आव्हाड एक्सवर व्हिडीओ पोस्ट करून म्हणाले की, महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्यही बाळगले नाही. साताऱ्यात त्यांनी काय केले बघा, कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना 90, 935 मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही 90, 935 एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय? हास्यास्पद आहे; पण, हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे असेही आव्हाड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here