Accident: कार व कंटेनरच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

0

उस्मानाबाद,दि.१ जानेवारी २०२२: कार व कंटेनरच्या भीषण अपघातात एकच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरची वाहतूक करणारा अवजड कंटेनर व कारची समोरासमोर धडक होऊन चारजण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उस्मानाबाद ढोकी रस्त्यावरील भडाचीवाडीनजीक घडली. मृतांमध्ये एकाच घरातील दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून सर्व मृत लातूर येथील रहिवासी होते.

नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येलाच हा अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आळणी फाट्याजवळ कंटेनर क्रमाक एम. एच ०४ एफ बी २०५५ हा ट्रक्टरघेवून औरंगाबादकडे जात होता. तर एम एच २४ एए ८०५५ हि कार लातूरकडे जात होती. यावेळी या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त गाडी एम एच २४ एए ८०५५ मधील ४ जण ठार झाले असुन ही कार लातूर येथील आहे.

वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील हिरकणाबाई मुरलीधर पाडे वय – ७०, उमेश मुरलीधर पाडे वय-५०, सविता उमेश पाडे वय – ४५, प्रतिक उमेश पाडे वय -२३ रा.प्रकाश नगर लातूर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर चारही मृतदेह येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन नातलगाच्या ताब्यात देण्यात आले असून या अपघाताची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस निरिक्षक एस एन साबळे हे तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here