महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा गुप्तचर विभागाकडून अलर्ट

0

मुंबई,दि.3: कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा गुप्तचर विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. भोंग्यावरून राज्यात वातावरण तापलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी 4 मे पर्यंतचा अल्टिमेट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. यातच, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाकडून मिळाला आहे.

पोलिसांना आदेश

इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे गृह विभागाने सांगितले आहे. तसेच, महाराष्ट्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.

1 मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत 12 अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला 16 अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम 116, 117, 152 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here