मुंबई,दि.11: Maharashtra Budget 2022: कोरोना संकटाशी तोंड देताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसुत्रावर आधारित अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. बजेट मांडताना अजितदादांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. 
निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई
दिला शब्द राज्याला की, धैर्याने जिंकू लढाई
लढाई लढताना विजयाची जागवली आशा, देशाने पाहिले अवघ्या आम्ही योग्य दाखवली दिशा
असं म्हणत अजित पवारांनी आपण करत असलेल्या कामांची दिशा स्पष्ट केली. अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून 250 कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. 
बजेटमधील घोषणा
हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील.
जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींच्या निधीची तरतूद
मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार
तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद कर्करोग व्हॅनसाठी करणार 8 कोटींची तरतूद
आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार
Home  महाराष्ट्र  Maharashtra Budget 2022: लढाई लढताना विजयाची जागवली आशा, देशाने पाहिले अवघ्या आम्ही...
 
            
