Home देश ‘ऑपरेशन टायगर’ फत्ते! ठाकरे गटाचे ६ खासदार फुटले; वर्धापनदिनी घेणार मोठी भूमिका

‘ऑपरेशन टायगर’ फत्ते! ठाकरे गटाचे ६ खासदार फुटले; वर्धापनदिनी घेणार मोठी भूमिका

0

नवी दिल्ली,दि.१७: महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (UBT) पक्षाला दिल्लीत फार मोठे खिंडार पडले असून, त्यांच्या ९ पैकी तब्बल ६ खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या नव्या गटाला अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे उद्धव ठाकरे यांना लोकसभेत मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाले असून, हे बंडखोर खासदार आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीत मध्यरात्री घडल्या वेगवान हालचाली

१० जून रोजी दिल्लीत पार पडलेल्या एनडीएच्या (NDA) बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून या ऑपरेशनला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर काल रात्रीपासूनच ठाकरे गटाचे हे सहा खासदार गुप्तपणे दिल्लीत दाखल झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली आणि स्वतंत्र गटाचे पत्र सुपूर्द केले. अध्यक्षांसमोरच कायदेशीर स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी दोन-तृतीयांश (२/३) बहुमताची गरज असते, जी ६ खासदारांमुळे पूर्ण झाली आहे.

👥 ठाकरेंची साथ सोडणारे ६ बंडखोर खासदार:

संजय जाधव

संजय देशमुख

नागेश पाटील आष्टीकर

ओमराजे निंबाळकर

भाऊसाहेब वाकचौरे

संजय दिना पाटील

वर्धापनदिनी काय होणार?

खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर यांच्यासह सर्व बंडखोर खासदारांना दिल्लीतील एका अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. या सर्व घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या आगामी वर्धापनदिनी हे खासदार जाहीरपणे आपली भूमिका मांडणार असून, याच दिवशी ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या राजकीय भूकंपावर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.