Rajesh Tope On Corona: महाराष्ट्राची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे वाटचाल: आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

जालना,दि.७: Rajesh Tope On Corona: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Maharashtra) पुन्हा वाढत आहे. विशेषतः मुंबईत (Mumbai) सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. आता मुंबईत २० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गर्दी टाळा, निर्बंध न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तसेच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिला आहे.

काल राज्यात ३६ हजार कोरोना रुग्णांचा टप्पा पार झाला असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिला आहे.

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन केलं आहे. तसंच, रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांनी धोक्याचा इशारा देखील दिला आहे. ते जालन्यात बोलत होते.

आता लागू केलेल्या निर्बंधाचे पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारा देखील टोपे यांनी दिला आहे. मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले जातील. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही त्यावेळेत निर्बंध आणता येईल का याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. मात्र, भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असा इशारा टोपे यांनी दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here