मुंबई,दि.11: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी महापालिका निवडणुकांचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येत निवडणुका लढवल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठा विजय मिळाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. ठाकरे गटाने फक्त 20 जागांवर विजय मिळवला होता.
काय म्हणाले संजय राऊत?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असे राऊत म्हणाले. कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर पक्ष मजबूत होईल असे त्यांनी म्हटले आहे.