Devendra Fadnavis On Lok Sabha Result: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

0

मुंबई,दि.5: Devendra Fadnavis On Lok Sabha Result: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये ‘मला सरकारमधून मोकळं करा’ अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला. मागील लोकसभा निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा मात्र अवघ्या नऊ मतदारसंघांमध्ये विजय मिळवता आला.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश न मिळाल्याने फडणवीसांनी केलेल्या या विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय भूंकप होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? Devendra Fadnavis On Lok Sabha Result

“जागा कमी आल्यात हा फॅक्ट आहे. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपामध्ये मी करत आहे. जो पराभव झाला, ज्या जागा कमी झाल्या त्याची जबाबदारी माझी आहे. मी हे मान्य करतो की मी कुठेतरी यामध्ये स्वत: कमी पडलो आहे. मी ती कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करणार. भाजपाला महाराष्ट्रात जो काही सेटबॅक सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे,” असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

“मी भाजपाकडे अजून विनंती करणार आहे. भाजपामध्ये सगळे निर्णय पक्षच करतो. मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचं आहे. मी आघाडीच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. ज्यामुळे मला पक्षासाठी काम करता येईल,. ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला माझा पूर्ण वेळ देता येईल,” असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here