धाराशिव,दि.28: Tanaji Sawant On Politics: शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. राज्यात सत्तांतर झाले व शिंदे मुख्यमंत्री झाले. अचानक एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का देत महाविकास आघाडी सरकार पाडले. शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले. अचानक एकदम एवढे मोठे बंड कसे झाले? असा प्रश्न उपस्थित होतो.
तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट | Tanaji Sawant On Politics
2019 सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे. नरेंद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडनुका लढलो जनतेने कल ही आमच्या बाजुने दिला माञ उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दिडशे बैठका घेतल्या असल्याचा डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितल आहे. सावंत यांच्या या गौप्यस्फोटाने राज्यातील सत्ता बदलात माझा काही हात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी या आधी सांगितल होत. पण सावंत यांनी सत्ताबदलात फडणवीस यांचा हात असल्याचा सांगितल्याने यापूर्वी फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संशय निर्माण झाला आहे.