पाकिस्तानने कुरघोड्या थांबवल्या नाहीत तर सर्जिकल स्ट्राइकसाठी तयार राहावं : अमित शहा

0

नवी दिल्ली,दि.१५: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला जाहीर इशारा दिला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवावं. पाकिस्तानने सुधारणा न केल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक होईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जाहीरपणे सांगितलं. काश्मीरमधील नागरिकांच्या हत्येसाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिला आणि मर्यादा ओलांडली तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

भारताच्या सीमेशी छेडछाड करणं इतकं सोपं नाही. काही वर्षांपूर्वी पूंछमध्ये हल्ला झाला. तेव्हा पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राइक करून भारताने जगाला दाखवून दिलं होतं. पंतप्रधान मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच आपल्या सीमेची सुरक्षा आणि सन्मान सिद्ध केला, असं ते म्हणाले.

हेही वाचा मुख्याध्यापक कोण होणार यावरून दोन शिक्षकात मारामारी

https://twitter.com/ANI/status/1448571885768245250?s=20

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. पूर्वी दहशतवादी देशाच्या सीमा ओलांडत होते. त्यांनी दहशतवाद पसरवला. दिल्लीतून एका निवेदनाशिवाय काहीही होत नव्हते. पण पुंछमध्ये हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सीमेशी छेडछाड करणं इतकं सोपं नाही, हे भारताने दाखवून दिलं होतं, असं त्यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here