सोलापूर,दि.२६: अनेकांना आपल्या कामानिमित्त मंत्रालयात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांची कामे होण्यास विलंब लागतो. ही अडचण लक्षात घेऊन सोलापूर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सोलापुरात कार्यालय सुरू केले आहे. ज्या जनतेला आपले प्रश्न घेऊन राज्याचे मुख्यमंत्री किंवा मंत्रालयात जाता येत नाही अशा सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर शिवसेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी ‘सेवालय’ कार्यालय सुरू केले आहे.
सोलापूर शहरातील पार्क चौक येथील आयसीआयसीआय बँकेच्या पाठीमागे ‘सेवालय’चे संपर्क कार्यालय असुन या कार्यालयात सर्व सामान्य असे शेकडो नागरिक दररोज आपले अनेक प्रश्न घेऊन येतात निवेदनही देतात. सदर नागरिकांचे प्रश्न, निवेदने आठवड्यातुन एकदा मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहोचवले जातात. वैद्यकीय सेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, चॅरिटेबल ट्रस्ट निधी, गोरगरिबांचे उपचार असतील अशी अनेक कामे सेवालयच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या मार्फत सोडवले जातात.
गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज शेकडो नागरिक हे सेवालयच्या कार्यालयाला भेट देतात, कार्यालयात सहा सात कर्मचारी आहेत. जे आलेल्या नागरिकांच्या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून असतात आणि योग्य त्या पद्धतीने कागदपत्र जमा करतात. सेवालयच्या माध्यमातून कायमस्वरूपी सोलापूरकरांची सेवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. असे सेवालयाचे संस्थापक व शिवसेना जिल्हाप्रमुख ( शिंदे गट ) मनिष काळजे यांनी सांगितले. तसेच सोलापूर शहर, जिल्ह्यातील जनतेने आपले प्रश्न घेऊन सेवालय कार्यालयात यावे आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करु असे आवाहन मनिष काळजे यांनी केले.