Yogi Adityanath | तर काँग्रेसला फायदा होईल: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Yogi Adityanath On Rahul Gandhi: योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींना सल्ला

0

नवी दिल्ली,दि.5: Yogi Adityanath On Rahul Gandhi: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढली. ‘1947 पासून राहुल गांधी काय करत होते. देशात जातीच्या नावावर आणि समाजाच्या नावावर क्षेत्र आणि भाषेचा आधार घेऊन फाळणी तर काँग्रेसच्या काळात झाली आहे. जे त्यांना वारस हक्काने मिळालं आहे, ते देशाला परत करत आहे. हे तेच करत आहे. राहुल गांधी हे आपली नकारात्मक प्रतिमा सोडली तर काँग्रेसला फायदा होईल’ असा सल्ला योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राहुल गांधी यांना दिला. (Yogi Adityanath Interview)

ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये Network18 चे एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशचा विकासाच्या ब्लू प्रिंटबद्दल योगी आदित्यनाथ खुलासा केला आहे. तसंच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून सल्ला दिला.

1947 पासून राहुल गांधी काय करत होते | Yogi Adityanath On Rahul Gandhi

‘1947 पासून राहुल गांधी काय करत होते. देशात जातीच्या नावावर आणि समाजाच्या नावावर क्षेत्र आणि भाषेचा आधार घेऊन फाळणी तर काँग्रेसच्या काळात झाली आहे. जे त्यांना वारस हक्काने मिळालं आहे, ते देशाला परत करत आहे. हे तेच करत आहे. राहुल गांधी हे आपली नकारात्मक प्रतिमा सोडली तर काँग्रेसला फायदा होईल. पण, ते तसं करत नाही. ते त्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरत आहे. कोणत्या कार्यक्रमामध्ये गर्दी असणे म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळाला असं नसतं. सर्व सामन्य लोकांवर याचा काय फरक पडला, त्यांनी याचा कसा विचार केला हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक पक्षाला आपले कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. पण, देशाला त्यांनी त्यांचा हेतू काय आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींना फटकारलं.

लक्ष हटवण्यासाठी राम चरित्र मानसवर विधानं केली जात आहे | Yogi Adityanath Interview

विकास कामावरून लक्ष हटवण्यासाठी राम चरित्र मानसवर विधानं केली जात आहे. लोकसभेमध्ये जेव्हा याचे प्रश्न येईल, तेव्हा त्याचे उत्तर दिले जाईल. राम चरित्र मानस हे पवित्र ग्रंथ आहे. त्याच्याबद्दल मोठी आस्था आहे, उत्तर भारतातील प्रत्येक घरात मंगल कार्य होते, तेव्हा याचे पठण केले जात असते. राम चरित्र हे लोकांना जोडणारे आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक गावात राम चरित्र मानसाचे वाचण केले जात आहे. राम चरित्र मानसमध्ये निसाद राज आणि शबरीचे सुद्धा चित्र आहे. हे बुद्धीचा फेरा आहे. ज्या लोकांना राम चरित्र मानसाची माहिती असती तर त्यांनी यावर आक्षेप घेतला नसता, टीका केली नसती.

जनतेनं कायम विभाजन करणाऱ्या लोकांना फटकारलं

फाळणीच्या मुद्यावर उत्तर प्रदेशच्या जनतेनं खूप काही सहन केलं आहे. फाळणीमुळे आपली ओळख पटवण्याचे कारण सुद्धा सहन केले आहे. उत्तर प्रदेशची जनतेनं कायम विभाजन करणाऱ्या लोकांना फटकारलं आहे. 2014, 2017 मध्ये नाकारलं आणि आता 2019 मध्येही जनतेनं त्यांना नकार दिला आहे. पुढेही देतील, असंही आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here