भोपाळ,दि.16 : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका पंचायतीच्या लोकांनी सरपंच किंवा गावप्रमुख ( sarpanch or village head) निवडण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. येथे सरपंच (sarpanch) पदाच्या उमेदवारांच्या निवडीसाठी लिलाव लावण्यात आला आहे. यामागे गावकऱ्यांचा तर्क असा आहे की, उमेदवार जिंकण्यासाठी पैसे चुकीच्या पद्धतीने पैसे वापरणार नाहीत. बोलीतून मिळालेल्या पैशातून गावाचा विकास होईल. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा आणि तणाव असणार नाही. हे प्रकरण मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील भटौली ग्रामपंचायतीचे आहे. सरपंचपदासाठी चार दावेदार होते.
उमेदवारांच्या निवडीसाठी 21 लाख रुपयांपासून बोली लागली. यानंतर बोली 43 वर पोहोचली. नंतर 44 लाखांची बोली लावून एका उमेदवाराला सरपंचपदी स्वीकारण्यात आले. सौभाग सिंह यादव असे उमेदवाराचे नाव आहे.
मात्र, या पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासह योग्य निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या पंचायतीत सरपंचपदासाठी अन्य कोणीही निवडणूक लढवणार नाही. सौभाग सिंह यादव यांची एका मंदिरातील बोलीत एकमताने “निवड” झाली. ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करून नूतन सरपंच घोषित केले. पंचायत निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज भरणार नाही, हेही निश्चित होणार आहे.
त्याच वेळी, या संदर्भात असे सांगितले जात आहे की, जर उमेदवार बोली अंतर्गत 44 लाख रुपये जमा करू शकला नाही, तर त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा या पदासाठी विचार केला जाईल, जो गाव समितीचा भाग होता.
मात्र, या प्रक्रियेला मान्यता दिली जाणार नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जो कोणी निवडणूक लढवतो, त्याला फॉर्म भरावा लागेल. जर सरपंचपदासाठी फॉर्म आला आणि तो वैध ठरला, तर तोच व्यक्ती सरपंच म्हणून निवडून येईल. मात्र, याद्वारे बोली लावलेली व्यक्तीही फॉर्म भरून या प्रक्रियाद्वारे, सरपंच देखील होऊ शकते.”
मध्य प्रदेश पंचायत निवडणुकीसाठी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. शिवराज सिंह चौहान सरकारने राज्यातील आगामी पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण आवर्तन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.