‘…त्यांनी भारत सोडून पाकिस्तानात निघून जाव’ इमाम उमेर अहमद इलियासी

0

मुंबई,दि.30: अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची प्राणपर्तिष्ठा करण्यात आली. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम, डॉ. इमाम उमर अहमद इलियासी (Umer Ahmed Ilyasi) यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये त्यांचा समावेश होता. आता त्याच्याविरोधात फतवा काढण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सडेतोड उत्तरही दिले आहे.

त्यांनी भारत सोडून पाकिस्तानात निघून जाव

इमाम उमेर अहमद इलियासी राम मंदिर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यापासून कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. त्यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. “मी फतवा मानत नाही. काहीही होऊ दे मी माफी मागणार नाही. ज्यांना अडचण असेल, त्यांनी भारत सोडून पाकिस्तानात निघून जाव” असं डॉ इमाम उमेर अहमद इलियासी म्हणाले.

आपल्या विरोधात जारी केलेल्या फतव्याबाबत उमर अहमद म्हणाले, ‘मुख्य इमाम या नात्याने मला श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले होते. दोन दिवस विचार करून अयोध्येला जायचे ठरले. हा फतवा काल काढण्यात आला होता पण मला 22 जानेवारीच्या संध्याकाळपासून धमकीचे फोन येत आहेत.

मी माफी मागणार नाही

ते पुढे म्हणाले, ‘मी काही कॉल रेकॉर्ड केले आहेत ज्यात कॉल करणाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्यावर आणि देशावर प्रेम करणारे मला साथ देतील. मी कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे माझा द्वेष करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे. मी प्रेमाचा संदेश दिला आहे. कोणताही गुन्हा केला नाही. मी माफी मागणार नाही आणि राजीनामाही देणार नाही. धमक्या देणारे त्यांना हवे ते करू शकतात.

अहमद इलियासी म्हणाले की, “आपण भारतात राहतो, भारतीय आहोत. आपण सर्वांनी मिळून भारताला मजबूत बनवूया. आमच्यासाठी राष्ट्र सर्वोपरि आहे. हेच माझ वक्तव्य होतं” “त्या विरोधात फतवा जारी करण्यात आलाय. “माझ्याविरोधात देशभरातून फतवे येत आहेत. मी जेव्हापासून अयोध्येवरुन परतलोय, माझ्या फोनवर मला आणि माझ्या कुटुंबाला धमक्या मिळत आहेत” असं इमाम उमेर अहमद इलियासी यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here