Uddhav Thackeray’s Mission 40: एकनाथ शिंदेंच्या आमदारांविरोधात उद्धव ठाकरेंचं मिशन 40!

0

मुंबई,दि.1: Uddhav Thackeray’s Mission 40: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्यानं उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) सरकार कोसळलं, ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. आता शिंदेंसह इतर 40 आमदारांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. या आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. (Uddhav Thackeray’s Mission 40)

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. ठाकरे-शिंदे वादात सध्या शिवसेना नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे 2 गट पक्षात पडले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदेच्या विरोधात थेट दंड थोपटले आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाचा फैसला सध्या निवडणूक आयोगाच्या कचेरीत सुरु आहे, हा फैसला होईल तेव्हा होईल पण शिंदे सेनेला थेट निवडणुकीच्या रंणागणात चितपट करण्याचा विडा उद्धव ठाकरेंनी उचलला आहे. आगामी काळात होत असलेल्या महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी उद्दव ठाकरेंनी आतापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी रोज मातोश्रीवर बैठकांचा सपाटा लावला आहे.

विधानसभा मतदारसंघानुसार आढावा घेण्याचं काम सध्या उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम करत आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 40 विधानसभा मतदारसंघांसाठी उद्धव ठाकरे रणनीती आखत आहेत. या 40 विधानसभा क्षेत्राचा सध्या उद्धव ठाकरे आढावा घेत आहेत. गतवर्षीच्या निवडणुकांमधल्या आकडेवारीसह ठाकरे थेट पदाधिका-यांशी चर्चा करत आहेत. एवढच नाही तर मागच्या काही निवडणुकामध्ये कट्टर सैनिकांला तिकिट देता आलं नाही, अशा नाराज व पराभूत उमेदवारावर उद्धव ठाकरेंचं बारकाईनं लक्ष आहे.

यात मुख्यत: एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मागील निवडणुकीतील आकडेवारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करत याठिकाणी पुढील निवडणुकीत कुणाला उभे करायचं याचा आढावा घेतला जात आहे. इतकेच नाही तर त्या मतदारसंघातील कट्टर शिवसैनिकाला पुढे आणून बंडखोरांविरोधात उभे करण्याचंही ठाकरे विचार करत आहेत. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बंडखोरी झाली. त्यामुळे या विभागातील प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवली आहे. त्यातील ४० मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक आमदार आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात धुसपूस होती का? कुठला पदाधिकारी आमदाराला टक्कर देऊ शकतो? त्याचसोबत इतर पक्षातील कोण नेता बंडखोराला आव्हान देण्यास सक्षम आहे याचा आढावा घेतला जात आहे.

केवळ मतदारसंघातच नव्हे तर स्थानिक बूथ पातळीवर हा आढावा घेतला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत कमबॅक करायचा असा चंग ठाकरेंकडून बांधला जात आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री काळात केलेली कामे, विरोधकांच्या धोरणांमुळे राज्यातील प्रकल्प इतर राज्यात गेल्याचा मुद्दा असे अनेक विषय आगामी काळात पुढे आणले जाणार आहेत. मात्र येत्या निवडणुकीत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याचं चित्र असल्याने उद्धव ठाकरेंसाठी हे आव्हानात्मक आहे. मात्र 40 बंडखोर आमदारांच्या मतदारसंघ जास्तीत जास्त जागा मिळवायच्यात असं ठाकरेंकडून प्लॅन आखण्यात आला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here