तो बेलगाम सोडलेला वळू भाजपची मदत करतो या नेत्यानी केली बोचरी टीका

0

हैद्राबाद,दि.26: येथील सोडलेला बेलगाम वळू (unbridled bull) भाजपची (bjp) मदत करत आहे. हा वळू (bull) देशभर भाजपची मदत करत आहे, त्याला येथेच बांधून ठेवा असे AIMIM प्रमुख असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केली आहे. राकेश टिकैत गुरुवारी (दि.25) हैदराबादला गेले होते, त्यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

टिकैत म्हणाले, तो (ओवेसी) भाजपला सर्वात मोठे मदत करणारा आहे. त्याला इथून बाहेर जाऊ देऊ नका, तो म्हणतो काहीतरी आणि करतो वेगळे, त्याचा उद्देश काही वेगळाच असतो. त्याला बांधून ठेवा. हैद्राबाद आणि तेलंगणाच्या बाहेर जाऊ देऊ नका, जिथे जाईल तेथे भाजपला मदत करतो. हे संपूर्ण भारताला माहीत आहे. हा बेलगाम बैल आहे. तो विधान काहीतरी वेगळेच करतो. भाजपवाले त्याला वेगळ्या पद्धतीने मांडतात. हा पक्ष भाजपची बी टीम आहे.

भाजपला जेथे पराभवाची भीती असते, तेथे औवेसींची रॅली काढण्यात येते. औवेसी हे भाजपचे चाचाजान आहेत, ते हिंदू-मुस्लीम करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही टिकैत यांनी औवेसींवर केला आहे. भाजपला पराभूत करणे, ही संयुक्त किसान मोर्चाची भूमिका आहे. आम्ही युपीमध्ये जाऊन लोकांना सांगू, भाजपला पराभूत करण्याचं आवाहन आम्ही करू, असेही टिकैत यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी यांनी इतकीही गोड भाषा वापरू नये की ज्यापुढे मधही फिका पडेल. तीन कृषी कायदे रद्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मधाळ भाषा वापरली आहे. या आंदोलनात 750 जण मरण पावले, आंदोलकांवर 10 हजार खटले भरण्यात आले आहेत. ते रद्द होण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली नाही. पंतप्रधानांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही, असे म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदींवर प्रहार केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here