सोलापूर,दि.१९: महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीच्या औचित्य साधून जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळ सोलापूर यांच्या वतीने गोविंद श्री चौक समोरील पटांगणामध्ये इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान पार पडले.
या जयंतीच्या औचित्य साधून शिवरायांचा अजरामर इतिहास जन सामान्य माणसांना माहित व्हावा या उद्देशाने उत्तम लेखक शिवचरित्र अभ्यासक, शिवप्रेमी प्रबोधनकार श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवरायांची अर्थव्यवस्था, पर्यावरण प्रेम, आणि पर स्त्रियांचा माते प्रमाणे शिवरायांनी दिलेली वागणूक याचा इतिहास कोकाटे यांनी मांडला. तसेच आपला शेतकरी जगला तरच अर्थ व्यवस्था टिकेल असा कौल त्यांनी मांडला. भारतीय संविधान मधील समानता, बंधुता, धर्म निरपेक्षता अशा अनेक तत्वांचा अवलंब शिवरायांनी आपल्या स्वराज्यात केला होता. जनतेनं समाजात प्रेमाने रहावे, वाचलं तर वाचलं असा जाहीर संदेश श्रीमंत कोकाटे यांनी दिला.
यावेळी सोलापूर मध्यवर्ती शिव जन्मोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष चेतन चौधरी, समाजसेवक महादेव कोगणुरे, प्रकाश राठोड, बंटी चंदनशिवे, कीर्तीपाल गायकवाड, संतोष कटगेरी, सीताराम बाबर, अरविंद शेळके, रविकांत शिरगिरी, मारुती गोरे, रमेश चव्हाण, रुपेश खीरसावंगी, ओंकार कदम, नवनाथ कदम, लक्ष्मी माने, सुनीता बोकडे, उज्वला उबाळे, मानसी गोरे, प्राध्यापक संतोष कदम, शिवा वाघमारे, नामदेव पवार, राहुल महाजन, विनय देशपांडे, सुधीर सांगेपंग, आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित