सोलापूर,दि.२३: भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास संघटना उद्दिष्टामधील विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नावर लोकशिक्षण, लोकजागृती इ. साध्य करण्यासाठी न्यासाच्या कामकाजात मध्यंतरीच्या काळात मरगळ आली होती. जनतेची दैनंदिन जीवनात अनेक बाबींमध्ये अडवणूक चालू होती. अन्याय, अत्याचार, लाचलुचपत इत्यादींशी तोंड द्यावे लागत होते.
या सर्व गोष्टीस आळा घालण्यासाठी न्यासाचे पुनर्गठन करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने न्यासाचे मूळ संस्थापक व ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांच्या न्यासाच्या अध्यक्षांची राज्यव्यापी बैठक दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी राळेगणसिध्दी येथे घेतली.
सदर बैठकीत न्यासाच्या पुनर्घठन करण्याबद्दल सांगोपांग चर्चा झाली. चर्चेत अण्णा हजारे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. प्रत्येक जिल्हयासाठी अनुभवी संघटकांची नियुक्ती करून तालुका पातळीवर निमंत्रकांची नेमणूक करुन कामात गती वाढवावी असे आदेश काढले आहेत. सोलापूर जिल्हयासाठी ‘संघटक म्हणून मधुकर भोसले यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
मधुकर भोसले यांनी अक्कलकोट तालुक्यासाठी निमंत्रक म्हणून संजय किणीकर यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीपत्र मिळालेल्या तारखेस संजय किणीकर यांनी पदभार स्वीकारावा आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत. आपल्या तालुक्यातील ग्रामीण तसेच नागरी भागातील चारित्र्यशील निःस्वार्थी व सामाजिक, राष्ट्रीय दृष्टिकोन असणा-या व राजकीय पक्षांसी संबंध नसणा-या कार्यकर्त्यांची निवड करावी. तरुणांना व महिलांना प्राधान्य द्यावे. असे मधुकर भोसले यांनी म्हटले आहे.