मुंबई,दि.23: विधानसभा निकालामागे खूप मोठे कारस्थान आहे, निकाल लावून घेतलेला दिसतो, असे शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत म्हणाले. राज्यातील विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे सर्वाोधिक उमेदवार आघाडीवर असल्याचे तर महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीच्या ट्रेंडवरून संजय राऊत यांनी निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली आहे. कुछ तो गडबड है असे राऊत म्हणाले. हा निकाल जनतेने दिलेला नाही तर लावून घेतलेला आहे. महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून लावला आहे असा आरोप राऊत यांनी केला.