मुंबई,दि.२: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना प्रत्युत्तर दिले आहे. ओवैसी यांच्या प्रश्नाचे उत्तर आठवले यांनी दिले आहे. आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) श्रेणी अंतर्गत १० टक्के आरक्षण मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली
रामदास आठवले पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात मुघल येऊन राज्य केले हे खरे आहे. त्यांनी अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, माझ्या मंत्रालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये मराठा समाजातील लोकांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्येही मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.”
मराठ्यांना आरक्षण का नाही? : असदुद्दीन ओवैसी
शनिवारी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर व्यंग्यात्मक टिप्पणी केली होती. ओवेसी यांनी मराठा समाजाला आरक्षण न दिल्याबद्दल केंद्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ओवेसी म्हणाले, “जर नरेंद्र मोदी आणि भाजपला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढीच आपुलकी आहे तर मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्ही हे का करत नाही?”
फक्त ८० मंदिरे पाडण्यात आली
एआयएमआयएमच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त, ओवैसी यांनी अमेरिकन इतिहासकार रिचर्ड एम ईटन यांच्या हवाल्याने दावा केला की मध्ययुगीन भारतात मुस्लिम राजवटीत फक्त ८० मंदिरे पाडण्यात आली. अनेक हिंदू सम्राटांच्या कारकिर्दीत हजारो मंदिरे उद्ध्वस्त झाली.
ओवैसी म्हणाले, “प्रसारमाध्यमांमध्ये सर्वत्र असे म्हटले जाते की ४०० वर्षांपूर्वी मंदिरे पाडण्यात आली होती. रिचर्ड एम ईटन (अमेरिकन इतिहासकार) यांनी त्यांच्या ‘टेम्पल डिसेक्रेशन अँड मुस्लिम स्टेट्स इन मेडिवेल इंडिया’ या पुस्तकात लिहिले आहे की ११ व्या शतकापासून १६०० पर्यंत मुस्लिम राजवटीत ८० मंदिरे पाडण्यात आली होती.”