जनतेची फसवणूक करणाऱ्या खोट्या फकिराकडे शिल्लक फक्त सात दिवस: राहुल गांधी

0

सोलापूर,दि.29: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेची फसवणूक करणाऱ्या खोट्या फकिराकडे फक्त सात दिवस शिल्लक आहेत, असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान 1 जूनला पार पडणार आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. ‘अब की बार चारसौ पार’ अशी घोषणा भाजपाने दिली होती. मात्र काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून भाजपा 200 पारही होणार नाही असा दावा केला जात आहे.

उत्तर प्रदेशातील देवरिया, गोरखपूर येथे राहुल गांधी यांनी मंगळवारी 4 जून रोजी लागणाऱ्या निकालाची भविष्यवाणी केली आहे. सोशल मिडीया प्लॅटफार्म X वर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले, “जनतेची फसवणूक करणाऱ्या खोट्या फकीराकडे आता फक्त सात दिवस शिल्लक राहिले आहेत. इंडिया आघाडीला मतं मिळत आहेत ‘खटाखट खटाखट’. आणि भाजपापासून देशाला मुक्ती मिळणार आहे, देशाचे खरे अच्छे दिन येणार आहेत – ‘फटाफट, फटाफट’”

सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष दोन्ही एकत्र आले आहेत. सायकलवर पंजाची मजबूत पकड असते. विजय निश्चित आहे. इंडिया आघाडीचा क्लीन स्वीप होणार आहे. जागांची लाईन लागणार आहे खटाखट खटाखट. ४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय नरेंद्र मोदी, टाटा!” असंही राहुल यांनी म्हटलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here