पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिलेंडरचा भाव 1 हजारावरून 500 रुपये कमी करुन महिलांना भाऊबीज द्यावी : सुप्रिया सुळे

0

पुणे,दि.31: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीच्या आठ दिवसासाठी सिलेंडरचा भाव 1 हजारावरून 500 रुपये कमी करुन महिलांना भाऊबीज द्यावी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आर्यन खान ड्रग प्रकरणावरून राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. आर्यन खानबाबत जे घडलं ते एक आई म्हणून वाईट वाटतं. ज्याच्याकडे काहीच सापडले नाही त्याला 26 दिवस कोठडी ठेवण्यात आलं, हा कुठला न्याय ? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितीत केला. तसंच, त्यांनी नवाब मलिक यांचीही जोरदार पाठराखण केली.

पुण्यात पत्रकारांसोबत बोलत असताना आर्यन खान प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता सुप्रिया सुळे यांनी आपले सडेतोड भूमिका मांडली. ‘एनसीबीने कशाप्रकारे केसेस उभ्या केल्यात याची पोलखोल नवाब मलिक यांनी केली आहे. त्यांनी केले आरोप हे योग्यच आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष मलिकांच्या पाठीशी ठाम उभा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

‘आर्यन खानबाबत जे घडलं त्याबद्दल एक आई म्हणून वाईट वाटतं. ज्याच्याकडे काहीच सापडले नाही त्याला 26 दिवस कोठडी ठेवण्यात आलं, हा कुठला न्याय? समाजाने याचा विचार करण्याची गरज असून केंद्राला जाब विचारला पाहिजे. आर्यन खानबाबत मीडिया ट्रायल व्हायला नको होती, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here