PM Modi: कोरीनाची दिवसात 1.50 लाख नवीन प्रकरणे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली आज तातडीची बैठक

0

नवी दिल्ली,दि.9: देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी रविवारी दुपारी साडेचार वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंतप्रधान काही मोठे निर्णयही घेऊ शकतात. देशातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर 10 च्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत, बैठकीदरम्यान लॉकडाऊनसारखे कठोर पाऊल उचलण्याची शिफारस देखील केली जाऊ शकते.

देशात कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच संसर्गाच्या संख्येने 1.5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 59 हजार 424 संसर्गाची प्रकरणे समोर आली असून 327 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 40,000 हून अधिक लोक बरे झाले आहेत.

राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, महाराष्ट्र (41,434), दिल्ली (20,181) आणि बंगालमध्ये (18,802) सर्वाधिक कोरोना संक्रमित झाले आहेत. टॉप 10 राज्यांमध्ये 1.26 लाखांहून अधिक लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here