सोलापूर,दि.१४: Pakistan Scared | भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असे पाकच्या बड्या नेत्याने म्हटले आहे. भारताने पाकिस्तानवर मोठा हल्ला करत पाकचे मोठे नुकसान केले. पाकिस्तानी अतिरेकी ठार झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकवर हवाई हल्ले करण्यात आले होते. भारताने आतापर्यंत केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानातील नेत्यांना अजून भारत हल्ला करू शकतो अशी भिती वाटू लागली आहे. (Pakistan Scared Marathi News)
युध्दविराम झाला असला तरी अजून भारत मोठा हल्ला करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी नेते म्हणत आहेत की भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या सैन्याशी संबंधित 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक अतिरेकी ठार झाले आहेत. (Pakistan Latest Marathi News)

भारत करणार पुन्हा हल्ला | Pakistan Scared
पाकिस्तानी टीव्ही चॅनेलशी बोलताना अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख आणि माजी मंत्री नदीम मलिक यांनी भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असे म्हटले आहे. मलिक म्हणाले, “मे महिना हा एक महत्त्वाचा महिना असेल. विशेषतः पुढील १७ दिवस, कारण युद्धविरामाची घोषणा होऊनही तणाव खूप जास्त आहे. १७ दिवसांत भारत पुन्हा पाकिस्तानचं टेन्शन वाढवू शकतो आणि हल्ला करू शकतो. कारण युद्ध अजून संपलेले नाही. तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानने सतर्क आणि सावध राहिले पाहिजे.”
पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या हल्ल्याची भीती नवीन गोष्ट नाही. पहलगाम येथील हल्ल्यानंतर दोन आठवड्यापर्यंत पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली होता. भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानची ही भीती वास्तवात आणली. भारताने या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या अतिरेक्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. 100 हून अधिक दहशतवादीही ठार केले.