Mumbai Fire: इमारतीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून ६ जणांचा मृत्यू, ४० जखमी

0

मुंबई,दि.६: Mumbai Fire: इमारतीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील गोरेगावमधील समर्थ इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री मुंबईतीलगोरेगाव येथे असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीतील पार्किंगला भीषण आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज असून तिथं असणाऱ्या जुन्या कपड्यांनी ती आणखी धुमसत गेली. आणि काही वेळातच संपूर्ण पार्किंग लॉटसह पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत ही आग पोहोचली. सध्या आग आटोक्यात आली आहे.

या आगीत ५० बाईक आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here