नवी दिल्ली, दि.10: Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादानंतरची संत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde Vs Thackeray) यांच्यातील सत्तासंघर्षाचा फैसला 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे (Supreme Court) जाणार की नाही, याचा फैसला आता 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कसा सुटणार याचा निर्णय पुढील महिन्यात होणार आहे. दरम्यान घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल, व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.
हेही वाचा UCC: समान नागरी कायदा संदर्भात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
सुनावणी आता 14 फेब्रुवारीला | Maharashtra Political Crisis
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादानंतरची संत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी थेट व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी) रोजीच घेण्यात येणार आहे. देशाच्या सरन्यायाधीशांनी ही सुनावणी पुढे ढकलल्याचे सांगितले. त्यावर, दोन्ही गटाच्या वकिलांनी हरकत न घेता, मान्यता दिली आहे.
काय घडलं न्यायालयात? | Maharashtra News
आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी सात न्यायामूर्तींच्या खंडपीठाची (Seven Judge Bench) गरज का आहे हे कोर्टाला सांगितलं. नबाम रेबिया (Nabam Rebia) खटल्याचा दाखला त्यांनी दिला. त्यावर कोर्टाने जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात याबाबतची सुनावणी घेण्याची अनुमती दर्शवली.
मात्र महाधिवक्त्यांनी 14 फेब्रुवारीनंतर ही सुनावणी घेता येईल का अशी विचारणा केली. त्यावर कपिल सिब्बल यांच्या म्हणण्याप्रमाणे 14 फेब्रुवारी हा अतिशय शुभ दिवस आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी इथे न थांबता घरी असायला हवे असं न्यायमूर्ती शाह म्हणाले.
त्यावर सरन्यायाधीशांनी आपण 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सुनावणी करु शकतो, त्यानंतर आसामचं प्रकरण सुनावणीला घेऊ असं सांगितलं. यावर मग शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी ठाकरे गटाचा मुद्दा कितपत टिकतो हे पाहायला हवं असं नमूद केलं. त्यानंतर सरन्यायाधीशांनी आपण 14 फेब्रुवारीला सुनावणी घेऊ असं सांगत, सुनावणीची पुढची तारीख जाहीर केली.
सहा महिन्यांपासून तारीख पे तारीख | Maharashtra News Today
सत्तासंघर्षाचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं 20 जानेवारी 2022 च्या दरम्यान. त्यानंतर आता आपण 2023 मध्ये आलो आहोत. सहा महिने झाले तरी या केसमध्ये अद्याप एकही निर्णय, आदेश झालेला नाही. केवळ बेंच बदलत आलेत. त्यामुळे आता 14 फेब्रुवारीला काय होणार याची उत्सुकता आहे.