सोलापूर,दि.27: Himanta Biswa Sarma On Lok Sabha: देशातील लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे झाले आहेत. सातव्या टप्प्याचे मतदान 1 जूनला पार पडेल. विरोधीपक्ष भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असा दावा करत आहेत. इंडिया आघाडीचे सरकार येईल असा दावा केला जात आहे. मात्र निवडणूक निकाला आधीच आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी नरेंद्र मोदी किती तारखेला पंतप्रधान पदाची शपथ घेतील याची तारीखच जाहीर केली आहे.
![Himanta Biswa Sarma On Lok Sabha](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2024/05/IMG_0283-1024x577.jpeg)
काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा | Himanta Biswa Sarma On Lok Sabha
आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, भाजप सरकार 10 जून रोजी शपथ घेणार आहे. यानंतर, 11 जून रोजी आम्हाला पांडियनला तामिळनाडूला परत पाठवायचे आहे. ओडिशातील पाटकुरा येथे मतदानाच्या शेवटच्या फेरीचा प्रचार करताना हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. ओडिशातही भाजपचा विजय होत असल्याचे ते म्हणाले. फक्त निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप सरकार 10 जून रोजी शपथ घेणार आहे. यानंतर 11 जून रोजी पांडियन यांना तामिळनाडू विमानतळावर पाठवायचे आहे.