जळगाव,दि.१: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे फडणवीस सरकारबद्दल (Shinde Fadnavis Government) मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांचे बंड महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंड ठरले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. (Eknath Khadse News)
हेही वाचा Barshi Pangri Fire: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
शिंदे फडणवीस सरकार कोसळू शकतं | Eknath Khadse News
महाराष्ट्राचं राजकारण आपण जे पाहतो आहोत त्यात आता अशा काही अनपेक्षित गोष्टी घडत आहेत की कधीही काहीही घडेल यावर आपला विश्वास बसला आहे. २०१९ ला झालेली महाविकास आघाडी. त्यानंतर अडीच वर्षांनी सरकार कोसळणं, एकनाथ शिंदे यांचं बंड, भाजपसोबत जाणं, शिवसेना दुभंगणं हे सगळंच उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. अशात आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकार कोसळू शकतं असं म्हटलं आहे.


काय म्हणाले एकनाथ खडसे? | Eknath Khadse On Maharashtra Politics
शिंदे फडणवीस सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांनी याविषयी उघडपणे सांगितलं आहे. अब्दुल सत्तारांनी आता हे नेमके कोण आहेत तेदेखील स्पष्ट सांगून टाकावं. त्यांच्या विरोधात जे षडयंत्र झाल्याचं म्हणत आहेत त्यांची नावं त्यांनी जाहीर करावीत. शिंदे फडणवीस सरकारवर अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार आहे. कोर्ट काय निकाल देतं त्यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. त्यात मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता जर वाढली तर सरकार कधीही कोसळू शकतं असा दावा एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केला आहे.
संजय राऊत यांचा मोठा दावा
शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा दावा केला आहे. राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार बेकायदा आहे. हे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा उद्धव ठाकरे गटाकडून केला जातो. संजय राऊत यांनीदेखील ‘सामना’ दैनिकातील ‘रोखठोक’ (Saamana Rokhthok) या सदरात सरकारच्या वैधतेवर भाष्य केले आहे.
त्यांनी राज्यातील सध्याचे सरकार अवैध आहे. लोकशाही व भारतीय घटनेचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकाकडे ढकलत आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा खटला न्यायालयात सुरू आहे. सर्व काही कायद्याने झाले तर आमदारांसह शिंदे सरकार घरी गेलेले दिसेल. असा दावा संजय राऊत यांनी केला.
अब्दुल सत्तार टार्गेटवर
नागपूरमध्ये नुकतंच जे हिवाळी अधिवेशन पार पडलं त्यात अब्दुल सत्तार यांना टार्गेट करण्यात आलं होतं. अजित पवार, जयंत पाटील यांच्या सारख्या नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांवरून त्यांना टार्गेट केलं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच इतरही काही मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार जास्तच अडकले. त्यानंतर अधिवेशनात आपल्याला अडकवणारे आणि बदनाम करणारे आपल्याच पक्षातले आहेत असं म्हटलं होतं. हाच धागा घेऊन एकनाथ खडसे यांनी मंत्र्यांमधली अस्वस्थता वाढली तर हे सरकार कधीही कोसळू शकतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.