दि.27: झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) मधील डॉ. अजित कुमार देवचा कातळवाडीतील ग्रामस्थांनी पुतळा उभारला आहे. देवमाणूस मालिकेचा दुसरा सिजन (देवमाणूस 2) येणार आहे. ‘देवमाणूस’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. ही मालिका सत्य घटनेपासून प्रेरणा घेऊन बनविण्यात आल्याचे बोलले जाते. मालिकेतील डॉ. अजित कुमार देव अनेकांना फसवून त्यांची हत्या करतो. गावातील लोकं मात्र त्याला देवमाणूस समजतात असे मालिकेत दाखवण्यात आले होते.
देवमाणूस मालिकेने 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मालिकेचा दुसरा सिजन (Devmanus season 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवमाणूस 2 या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाल्याचे श्वेता शिंदेने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यामुळे ती परत आलीये ह्या मालिकेच्या जागी आता देवमाणूस ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डॉक्टरची भूमिका अभिनेता किरण गायकवाड याने साकारली होती.
प्रेक्षकांमध्ये देवमाणूसच्या दुसऱ्या सीजनची उत्सुकता असून मालिकेचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. किरण गायकवाडनं एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत कातळवाडीतील ग्रामस्थांनी देवमाणसाचा म्हणजेच डॉ. अजित कुमार देवचा पुतळा उभारला आहे. हा पुतळा पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
किरण गायकवाडची मालिकेच्या सिक्वलमध्ये डॉक्टरच्या भूमिकेसाठी वर्णी लागणार आहे हे निश्चित झालं आहे. लवकरच मालिकेतील अन्य कलाकारांचा देखील उलगडा होईल पण एकीकडे मालिकेची उत्सुकता असतानाच डॉ अजितकुमार देव यांचा पुतळा जोरदार चर्चेत आला आहे. मालिकेतील डॉक्टर अजितकुमार देवचा पुतळा सोशल मीडियावर पाहिला जातोय.
झी मराठीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई या ठिकाणी देवमाणूस मधील प्रमुख व्यक्तिरेखा डॉ अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे पाहायला मिळले. आपल्या ओळखीच्या परिसरात अचानक हे पुतळे पाहून प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकानं संताप व्यक्त करत म्हटलं आहे की , या नालायक माणसाचा पुतळा लावण्यापेक्षा या पुतळ्याला पहिला फाशी द्यायल पाहिजे असं म्हटलं आहे. तर एका महिलाचा ग्रुप देखील हा पुतळा पाहून चांगलाच भडकतो. त्यातील एक महिला म्हणतेय की, ह्यो माणूस देव माणूस म्हणतोय ह्यो काय देवमाणूस हाय काय…सगळ्या बायकासनी मारून टाकून, खून करून ह्यो काय देवमाणूस आहे का?…अशी ही महिला रागाने म्हणताना दिसत आहे. यावरून एक लक्षात येते की ही भूमिका लोकांच्या किती डोक्यात गेली आहे. सर्वजण याचा तिरस्कार करत आहेत. असं असले तर मालिका पाहण्यासाठीही तितकेच अतुर आहेत.