काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगची विचारसरणी दर्शवतो: पंतप्रधान मोदी

0

सहारनपूर,दि.6: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याला ‘न्याय पत्र’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेसवर आक्षेप घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, काँग्रेसचा जाहीरनामा स्वातंत्र्य चळवळीदरम्यान मुस्लिम लीगमध्ये होती तीच विचारसरणी प्रतिबिंबित करतो. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा ठसा पूर्णपणे उमटलेला आहे आणि त्याचा जो काही भाग शिल्लक आहे, त्यावर डाव्यांचा पूर्ण वर्चस्व आहे. यात काँग्रेस अजिबात दिसत नाही.

सहारनपूरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस दशकांपूर्वी संपली आहे. आता उरलेल्या काँग्रेसकडे ना देशहिताची धोरणे आहेत ना राष्ट्र उभारणीची दृष्टी. काल काँग्रेसने ज्या प्रकारचा जाहीरनामा जारी केला त्यावरून आजची काँग्रेस आजच्या भारताच्या आशा आकांक्षांपासून पूर्णपणे दुरावलेली असल्याचे सिद्ध झाले आहे.

मोदी म्हणाले, “काँग्रेस पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी रॅली काढत नाही, तर भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी रॅली काढत आहे. त्यांनी कितीही सांगितले तरी भ्रष्टाचाराविरुद्ध मोदींची लढाई सुरूच राहणार आहे.”

मोदी म्हणाले, “काँग्रेसचा जाहीरनामा स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम लीगमध्ये जी विचारसरणी होती, त्याच विचाराचे प्रतिबिंब आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा पूर्णपणे उमटलेला आहे आणि त्याचा जो काही भाग शिल्लक आहे, त्यावर डाव्यांचा पूर्ण वर्चस्व आहे. यात काँग्रेस अजिबात दिसत नाही.

पीएम मोदी म्हणाले, “या लोकांनी जनतेचा पैसा लुटणे हा आपला कुटुंबाचा हक्क मानला. मोदींनी गेल्या 10 वर्षात लुटीच्या आजारावर कायमचा इलाज केला आहे.” 

उत्तर प्रदेशात सपाची परिस्थिती अशी आहे की त्यांना दर तासाला उमेदवार बदलावे लागतात, तर काँग्रेसची स्थिती तर आणखी विचित्र आहे, काँग्रेसला उमेदवारच मिळत नाहीत. काँग्रेस ज्या जागांवर आपला बालेकिल्ला मानत त्या जागांवरही उमेदवार उभे करण्याचे धाडस दाखवत नसल्याचे ते म्हणाले. (कदाचित पंतप्रधान उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या जागांचा संदर्भ देत असतील, जिथे काँग्रेसने अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही).

ते म्हणाले, “इंडिया युती हे अस्थिरतेचे आणि अनिश्चिततेचे दुसरे नाव बनले आहे आणि म्हणूनच आज देश त्यांच्या एकाही गोष्टीला गांभीर्याने घेत नाही.”

पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसला मुस्लिम लीगचे तत्कालीन विचार भारतावर लादायचे आहेत. मुस्लीम लीगचा ठसा असलेल्या या जाहीरनाम्याचा उर्वरित भाग डाव्यांनी ताब्यात घेतला आहे.” 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here