Breaking: भारताचे मोठे यश, मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला 29 वर्षांनंतर UAE मध्ये अटक

0

दि.5: Breaking: अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या भारताच्या मोठ्या शोध मोहिमेत, मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट (Mumbai 1993 chain bombings) प्रकरणातील भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक अबू बकर याला पकडण्यात भारतीय यंत्रणांना यश आले आहे. या स्फोटात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले. ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 713 लोक जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता अटक करण्यात आलेला दहशतवादी अबू बकर याला UAE मधून भारतात आणण्यात येणार आहे.

अबू बकर असे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो पीओकेमध्ये (POK) शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या प्रशिक्षणाशिवाय मालिका बॉम्बस्फोटात वापरलेले आरडीएक्स उतरवण्यात सहभागी होता. जो संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानमध्ये राहत होता. भारतीय एजन्सीच्या माहितीवरून त्याला नुकतेच यूएईमध्ये पकडण्यात आले.

गेली 29 वर्षे अबू बकर भारतीय तपास यंत्रणांना गुंगारा देऊन संयुक्त अरब अमिरात आणि पाकिस्तानात राहात असल्याचेही समोर आले होते. बकरला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, त्याने सादर केलेल्या दस्तावेजांमुळे संयुक्त अरब अमिरातच्या अधिकाऱ्यांनी मुक्तता केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बकरच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here