नवी दिल्ली,दि.2: पाकव्याप्त काश्मीरबाबत (POK) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अमित शाह यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, मला आनंद आहे की आज काश्मीर पुन्हा एकदा आपल्या भौगोलिक-सांस्कृतिक राष्ट्र भारताचा अविभाज्य भाग बनला आहे आणि भारतासोबतच विकासाच्या मार्गावर आहे. तिथेही लोकशाही प्रस्थापित झाली आहे आणि मला विश्वास आहे की आपण जे काही गमावले आहे ते लवकरच परत मिळवू.
अप्रत्यक्षपणे पाकव्याप्त काश्मीरही लवकरच भारताचा भाग होईल, असे वक्तव्य शाह यांनी केले. अमित शाह म्हणाले की, काश्मिरी, डोगरी, बाल्टी आणि झंकारी भाषांना सरकारची मान्यता देण्यात आली आहे, त्याबद्दल ते पंतप्रधान मोदींचे आभार मानतात. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर काश्मीरची छोटीशी स्थानिक भाषाही जिवंत ठेवण्याचा पंतप्रधानांचा आग्रह, यावरून पंतप्रधान काश्मीरबद्दल किती विचार करतात हे दिसून येते.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काश्मीर हा भारताचा भाग होता आणि राहील, लोकांनी तो वेगळा करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अडथळाही दूर झाला आहे. लुटियन्स दिल्लीत बसून इतिहास लिहिला जात नाही, तो तिथे जाऊन समजून घ्यावा लागतो. राज्यकर्त्यांना खूश करण्यासाठी इतिहास लिहिण्याची वेळ संपली आहे. मी भारतातील इतिहासकारांना पुराव्याच्या आधारे इतिहास लिहिण्याचे आवाहन करतो. गृहमंत्री म्हणाले की, काश्मीरला कश्यपची भूमी म्हणून ओळखले जाते, कदाचित त्यांच्या नावावरून काश्मीरचे नाव घेतले गेले आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
POKचे नाव न घेता गृहमंत्री म्हणाले, आजकाल काश्मीरमध्ये विकास होताना दिसत आहे आणि मला याचा आनंद आहे. मला विश्वास आहे की आपण जे काही गमावले आहे, ते लवकरात लवकर परत मिळेल. केवळ भौतिक विकासच नाही, तर काश्मीरची सांस्कृतिक उंचीही लवकरच गाठली जाईल. काश्मीरचे नाव कश्यप होऊ शकते. शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होते. सूफी, बौद्ध आणि शैल मठांनी काश्मीरमध्ये विकास केला. 8,000 वर्षे जुन्या प्राचीन ग्रंथांत जम्मू-काश्मीर आणि लडाखचा उल्लेख आहे, असेही शाह यावेळी म्हणाले.