सोलापूर,दि.१७: All Party Delegations News | पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर‘ (Operation Sindoor) नंतर, भारत सरकार या महिन्याच्या अखेरीस प्रमुख भागीदार देशांमध्ये सात सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवणार आहे जेणेकरून जागतिक स्तरावर दहशतवादाविरुद्धचा ‘जीरो टॉलरेंस’चा संदेश जोरदारपणे पोहोचवता येईल. “हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध भारताची एकमताने आणि ठाम रणनीती जगासमोर मांडेल,” असे संसदीय कामकाज मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ते दहशतवादाच्या सर्व स्वरूपांविरुद्ध आणि प्रकटीकरणांविरुद्ध भारताच्या कठोर भूमिकेचा संदेश घेऊन जातील. सरकारने सर्व प्रमुख राजकीय पक्षांमधून या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्यासाठी विविध वैचारिक पार्श्वभूमीतून आलेल्या नेत्यांची निवड केली आहे.

शिष्टमंडळांचे नेतृत्व करणारे प्रमुख नेते | All Party Delegations News
- रविशंकर प्रसाद (भाजप खासदार)
- बैजयंत पांडा (भाजप खासदार)
- शशी थरूर (काँग्रेस खासदार)
- संजय झा (जेडीयू खासदार)
- कनिमोझी (द्रमुक खासदार)
- सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाच्या खासदार)
- श्रीकांत शिंदे (शिवसेना खासदार)
यातील प्रत्येक शिष्टमंडळ सुमारे पाच देशांना भेट देऊ शकते. यामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देश आणि भारताचे प्रमुख धोरणात्मक भागीदार समाविष्ट असतील. प्रत्येक शिष्टमंडळात भारतातील वरिष्ठ आणि अनुभवी राजनयिकांचाही समावेश असेल, असेही निवेदनात म्हटले आहे. (All Party Delegations News Marathi)
सुप्रिया सुळे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार | All Party Delegations
दरम्यान, भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात माझा समावेश होणे याचा मला गर्व आहे. मी ही जबाबदारी विनम्रपणे स्वीकारते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि परराष्ट्र विभागाचे आभार मानते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
या शिष्टमंडळाचा हेतू स्पष्ट आहे की, दहशतवादाबाबत भारताची झीरो टॉलरेंस धोरण जगापर्यंत पोहचवणे. विशेषत: या अभियानात सर्व प्रमुख पक्षातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. ज्यातून दहशतवादाविरोधात भारत एकजूट आहे असं संकेत दिले जात आहेत.
शशी थरूर यांनी मानले आभार
याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, भारत सरकारच्या निमंत्रणाचा मला सन्मान आहे, ज्यामध्ये मला अलीकडील घटनांबद्दल आपल्या देशाचे मत मांडण्यासाठी पाच महत्त्वाच्या देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यास सांगण्यात आले आहे.