Nitin Gadkari: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर नितीन गडकरी यांनी घेतला महत्वाचा निर्णय

0

दि.7: Nitin Gadkari: सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Death) यांच्या अपघाती निधनानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल, म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 138(3) अंतर्गत, मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नाही. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलिसही दंड आकारत नाहीत.

मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघातामुळे मी ठरवले आहे की, ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म असेल. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल. मी या संबंधित फाइलवर सही केली. असंही गडकरी म्हणाले.

सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर हा निर्णय

यावेळी गडकरी म्हणाले, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अपघात होऊ नयेत यासाठी रस्त्यांची योग्य आखणी करावी, यावरही त्यांनी भर दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here